भारतीय शिक्षण एक दृष्टीक्षेप -- प्रा. श्यामराव अत्रे
परिचर्चा दि २ फ़ेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या चर्चेचे संकलन -
- प्रारुपात दीर्घकालीन व तात्कालिक उपाययोजना सुचवल्या आहेत त्यातील अनेक आज असंभव वाटतील.
- ४१ आयोग शिक्षणासाठी पण उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत.
- कोठारी आयोगामध्ये शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव करावा ही सुचना होती पण आवश्यक पायाभूत सोयी नसल्याने ती योजना अपयशी ठरली
- skilled labour नाही तर दुसरीकडे बेरोजगारी अशी स्थिती त्यातून निर्माण झाली.
- Neo-colonizationद्विस्तरीय पद्धती विघटनाला कारणभूत ठरेल.उदा. अनुदानित /विनाअनुदानित पद्धती
- globalisationखाजगीकरण त्यातून अनेक प्रश्न उभे राहणार आहेत.
- शिक्षक होण्यासाठी मिशन म्हणुन येणारे कमी असुन अन्य कुठेही प्रवेश न मिळाल्याने कला शाखा घेतलेले शिक्षक बनत आहेत.
- जोदधंदा म्हणुन शिक्षक बनत आहेत.
- best teacher to primary education असे धोरण हवे.
- शिक्षकांचे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वाचन नाही असा अनुभव आहे.
- उपाययोजना मांडण्यापुर्वी आदर्श प्रतिमान अगोदर मांडावे लागेल.
- ते घडवण्यासाठी प्रत्यक्ष वस्तुस्थिती लक्षात घेऊन कशी उपाययोजना करायची अशी मांडणि करणे आवश्यक आहे
- गुणवत्तावान शिक्षक हा गाभा घटक असून तो कसा घडवता येईल याचा विचार करावा लागेल.
- त्यासाठी गुणवत्तेला प्रोत्साहन द्यावे लागेल तसेच आर्थिक विवंचना राहणार नाही याचाही विचार करावा लागेल.
- घटनेने शिक्षण हा विषय केंद्र व राज्य यांच्या सामायिक सूचीत ठेवल्याने दोघांकडून यात प्रश्न अभे राहिले आहेत.
- मेकॉले ढाँचा बदलून पूर्णपणे भारतीय ढाँचा विकसित करणे हे तज्ञांच्या समुहाचे काम आहे.
- जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० मध्ये केवळ ३ भारतीय संस्था येतात.
- मेकॉलेने आणलेल्या structured शिक्षणपद्धतीतील अभ्यासक्रमातील सत्त्व बदलले तरीही परिणाम वेगळे येतील.
- संघ व विविध क्षेत्राशी निगडीत शिक्षण संस्थामधून यातील काही प्रयोग करण्याची आवश्यकता आहे.
- श्रमप्रतिष्ठा नसल्याने graduate आहे व शेतकरी आहे त्याला समाजात मान मिळत नाहीत.
- प्रत्यक्ष बदल करण्यासाठी सारांशरुपाने १०/१२ कृती योजना शिक्षणसंस्थासाठी सुचवण्याचि आवश्यकता आहे.
- वैद्यकिय शिक्षणाप्रमाणे internship सर्व अभ्यासक्रमात अनिवार्य करण्याची गरज आहे.
- dropout होणारे विद्यार्थी ही सुद्धा एक समस्या आहे.
- अनेक शैक्षणिक प्रयोगांचे मुल्यमापन करुन त्यांचे संकलन करण्याची आवश्यकता आहे तसेच त्यातील जे प्रयोग सर्वत्र अनुकरण करता येतील ते निश्चित करणे गरजेचे आहे.
- उदा. अरविंद आश्रमातर्फ़े चालवले जाणारे निवासी विद्यालय दिल्ली व पद्दुचेरी,डॉ कलभाग, प्रा रमेश पानसे, गिरिश बापट, ज्ञानप्रबोधिनी,
- नवीन प्रतिमान विकसित करण्यासाठी तज्ञांचा संच लागेल तसेच कालबद्ध योजना ठरवावी लागेल.
- उपजीविकेसाठी शिक्षण-- ज्ञानदानासाठी शिक्षण --- ज्ञानोपासनेसाठी शिक्षण ---- स्वान्ताय सुखाय शिक्षण असे टप्पे ठरवून वेगळ्या दृष्टीकोनातून सुद्धा विचार करता येईल.
No comments:
Post a Comment